जोरदार शक्तीप्रदर्शन करत सोनिया गांधींनी भरला अर्ज !

0

रायबरेली: कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन आज रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता. अर्ज भरल्यानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींना वाटत असेल की ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमज आहे. २००४ मध्ये वाजपेयींनाही असेच वाटत होते की ते अजिंक्य आहेत मात्र आम्हीच निवडून आलो असे सांगत सोनिया गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.


राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारताच्या राजकारणात असे अनेक लोक आहेत जे स्वतःला अजिंक्य समजतात. त्यांना असे वाटते की ते देशापेक्षा मोठे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशासाठी काहीही केले नाही. पाच वर्षात त्यांनी एकाही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्यांने जे वाटते आहे की मी अजिंक्य आहे तर तो त्यांचा गैरसमज ठरणार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. निकालाच्या दिवशी देशातलं चित्र बदललेलं असेल असाही विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.