मुंबई । शेतकर्यांच्या संपात आता नाम फआऊंडेशननेही उडी घेतली आहे. जो शेतकरी स्वतः फआशी घेऊ शकतो तो दुसर्यलाही देवू शकतो असे उद्वेगजनक वक्तव्य ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. तर शेतकरी संपाचा फुटबॉल करू नका असे वास्तववादी वक्तव्य मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी नाम फाऊंडेशननं शेतकरी आणि शेतकरी संपाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
सधन व्यक्ती आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पुढे येवून आधार द्यावा
आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकर्यांना न्याय मिळावा आणि त्याचे जगणे सुसह्य व्हावे ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असे अनासपुरे यांनी म्हटले आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर विविध क्षेत्रातल्या लोकांनी, प्रसिद्ध आणि सधन व्यक्तींनी एकत्र येऊन शेतकर्याला आधार दिला पाहिजे असेही पाटेकर यांनी यावेळी म्हटले. स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसेच ज्या शेतकर्यांना खरेच गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. जो शेतकरी गळफास घेऊ शकतो तो उद्या गळफास देऊही शकतो असेही मत नाना पाटेकर यांनी नोंदविले आहे. तसेच वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे ज्यामुळे शेतकर्याला आधार वाटेल, अशी प्रतिक्रियाही नाना पाटेकर यांनी दिली आहे.
पुरस्कांरापेक्षा शेतकर्यांना उभारी द्या
मंगळवारी मध्यप्रदेशात शेतकर्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरही नाना पाटेकर यांनी टीका केली आहे. नाम फाऊंडेशन ही संस्था गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचं काम करते आहे. या संस्थेला लोकांचंही पाठबळ मिळते आहे. आम्हाला कोणतेही पुरस्कार किंवा मानसन्मान देऊ नका त्याऐवजी शेतकर्याला उभारी देण्यासाठी एकत्र या, असंही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. नाम फाऊंडेशननेही संपाला पाठिंबा देत कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामुळे सरकारवरचा दबाव वाढतो आहे यात काहीही शंका नाही.