ज्यांच्यात युद्ध जिंकण्याची ताकद नाही ते फूट पडतात; मोदींनी पाकिस्तानला सुनावले !

0

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना त्यांनी मी आज राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक देशवासीयाला देशासमोर असलेल्या आव्हानांची आठवण करून देऊ इच्छितो. जे आपल्याशी युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणत पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे.

कलम 370ने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटिरतावाद पसरविण्याशिवाय काहीही केलेले नाही. पूर्ण देशात फक्त जम्मू-काश्मीरमध्येच कलम 370 लागू होते. जम्मू-काश्मीरमध्ये तीन दशकांत जवळपास 40 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. दशकांपासून भारतीयांसाठी कलम 370ही एक भिंत बनलेली होती. या भिंतीमुळेच जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवाद वाढत होता. आता ती भिंतच पाडण्यात आली आहे. पटेलांकडे काश्मीर प्रश्न असता तर तो सोडवण्यास एवढा वेळ लागला नसता. कलम 370 हटवण्याचा निर्णय मी जयंतीनिमित्त पटेलांना समर्पित करतो, असेही मोदी म्हणाले आहेत.