राजकोट : भारताविरुद्ध दोन टेस्ट, पाच वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ गुरुवारी राजकोटमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
जेसन होल्डरच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडिजचा संघ यजमान भारताशी भिडणार आहे.आत्ताच श्रीलंकेविरुद्ध झालेली कसोटी मालिका वेस्ट इंडिजने 1-1 अशा बरोबरीत सोडवली होती. भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा संघ बोर्ड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 4 ऑक्टोबरपासून कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे असून सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे.वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 1948 ते आत्तापर्यंत 94 कसोटी सामने झाले. वेस्ट इंडिजने त्यात 30 विजय मिळवले, तर 46 सामने अनिर्णीत राखले. 28 सामने भारताने जिंकले.
वेस्ट इंडिज संघ
जेसन होल्डर ( कर्णधार), सुनील अॅब्रीस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डोवरीच, शॅनोन गॅब्रीयल, जॅह्मर हॅमिल्टन, शिम्रोन हेटमेर, शाय होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरेन पॉवेल, केमार रोच, जोमेल वॅरिकॅन.