मुंबई । टी-20 क्रिकेटमध्ये हारू किंवा जिंकू, आम्ही त्याचा विचार करत नाही, फक्त युवा खेळाडूंना संधी मिळते आणि त्यातून 2019 साठी चांगले खेळाडू निवडता येतील, एवढंच आमचं ध्येय असते, असे भारतीय संघाचेे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले. मुंबईत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातील विजयानंतर रवी शास्त्री बोलत होते. त्यांनी गोलंदाज जयदेव उनाडकट आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांच्या कामगिरीचे कौतुक केले.जयदेव उनाडकटने अनेक महत्त्वाचे बदल स्वतःमध्ये केले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो क्रिकेट खेळत आहे. मात्र त्याची गोलंदाजी का महत्त्वाची आहे, ते त्याला आता समजायला लागलं आहेफफ, असंही रवी शास्त्री म्हणाले.सलामीवीर फलंदाज केएल राहुलच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं.
राहुल हा अप्रतिम खेळाडू आहे. त्याला सेट होण्यासाठी वेळ मिळाला, त्याचा फायदा घेत त्याने प्रत्येक प्रकारचे शॉट मारले. गेल्या 18-20 महिन्यांपासून स्वतःमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारा तो एकमेव खेळाडू आहे, असे रवी शास्त्रींनी सांगितले. भारताने श्रीलंकेविरुद्च्या तिसर्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले. धोनी 26 वर्षांच्या खेळाडूंनाही भारी पडेल.
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या वयावरुन टीका करणार्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याच्या वयाच्या 10 वर्षांपेक्षा कमी वय असणार्या खेळाडूवरही धोनी भारी आ हे, असे रवी शास्त्री म्हणाले. धोनीसारखा फिट खेळाडू सध्या संघात नाही. टीकाकारांनी त्याच्या वयाकडे पाहण्याऐवजी कारकीर्दीकडे पाहावे, असा सल्लाही रवी शास्त्रींनी दिला. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या वयावरुन त्याच्यावर नेहमी टीका केली जाते. त्यालाच उत्तर देताना रवी शास्त्रींनी टीकाकारांचा समाचार घेतला.मी गेल्या 30-40 वर्षांपासून क्रिकेटला जवळून पाहिले आहे. विराटही गेल्या दहा वर्षांपासून भारतीय संघाचा एक भाग आहे. आम्हाला चांगले माहितीय की, धोनी या वयातही 26 वर्षाच्या खेळाडूवरही भारी भरु शकतो. त्याची बरोबरी करणारे सध्या कुणीही नाही, असे रवी शास्त्री म्हणाले.