टोकरे कोळी समाजावरील गुन्हे मागे घ्यावेत

0

शिंदखेडा । दिनांक 10 ऑगस्ट 2009 रोजी टोकरे कोळी,महादेव कोळी,मल्हार कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी म्हणजे टोकरे कोळी, मल्हार कोळी,महादेव कोळी समाजाला सोप्या पद्धतीने अनुसुचीत जमातीचा दाखला व वैधताप्रमाणपत्र मिळावे म्हणून मा.अनंत तरे व शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता तेव्हा मा निवासी उपजिल्हाअधिकारी प्रकाश वाघमारे यांनी बसून निवेदन स्वीकारल्यावरून किरकोळ वाद झाले होते त्यानंतर पोलिसांनी मोर्चेकरूनवर प्रचंड लाठीमार व गोळीबार केला होता त्यात वडाळी ता.शहादा येथील भटूभाऊ कुंवर शहीद झाले होते.

पोलिसीबळाचा वापर केल्याचा ठेवला ठपका
या घटनेची चौकशी न्यायदंडाधिकारींमार्फत करण्यात आली होती त्या चौकशीत पोलिसांवर कमी वेळात जास्त बळाचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता तसेच मोर्चेकरांनी कोणतेही सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान केलेले नाही म्हणून हे गुन्हे मागेघेण्याची शिफारस सरकारला करावी अशा आशयाचे निवेदन आज दि.13 रोजी धुळ्याचे पोलिस अधिक्षक एस रामकुमार यांना देतांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे,संजय मगरे शिवसेनेचे दोंडाईचा उपशहरप्रमुख मनोज परदेशी, युवासेना शहरप्रमुख रोहित माळी,सारंग पाटील, दिपक ठाकुर यांच्यातर्फे देण्यात आले.