नवापूर:तालुक्यातील ठाणेपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोपवाटीका येथे कामांची पाहणी करुन आ. शिरीषकुमार नाईक यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी जि.प.सदस्य देवमन पवार, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, श्री.रघुवंशी (वनक्षेत्रपाल, नंदुरबार) तसेच वनव्यवस्थापन समिती ठाणेपाडा सदस्य व गावकरी उपस्थित होते.
साधारण 3 लाख वृक्ष तयार करण्यात आले असुन यात आंबा, मुहा,साग, सिताफळ, बोर, खैर,सिसु, भेडा, करंज, जांभूळ इत्यादी रोपे तयार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक नंदुरबार गणेश रणदिवे यांनी आ.नाईक यांना दिली.
यावेळी आ. शिरीषकुमार नाईक यांनी मग्रारोहया योजने अंतर्गत नवापूर तालुक्यात सुरु असलेले लागवड पूर्व कामे, सलग समतलचर कामे रोपवन कामे गाळ काढणे इत्यादी कामांची आढावा बैठक घेतली. वनक्षेत्रात असलेले वन्यजीव बिबट्या, मोर,तडस इत्यादी यांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठेबाबत माहिती घेण्यात आली. यानंतर वनअधिकारी व कर्मचारी यांना स्थानिक प्रजातीचे रोपे तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
वृक्षारोपण करुन ते जगवा
वृक्षारोपण काळाजी गरज असुन जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन ते जगवा. नवापूर तालुक्यात प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या घरा समोर एक वृक्ष लावलेच पाहिजे, असे आ.शिरीषकुमार नाईक म्हणाले.