ठोस पावलांचा उत्तम अर्थसंकल्प

0

नवी दिल्ली। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ठोस पावले उचणारा यांनी उत्तम अर्थसंकल्पफ मांडल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. पंतप्रधानांनी यावेळी डिजिटल माध्यमांमधून आर्थिक व्यवहारांची असलेली आवश्यकता अधोरेखित करत सरकार हे देशातील गरीबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे ठाम प्रतिपदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पनेतील महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले की, अर्थसंकल्पामधून भ्रष्टाचार व काळे धन नष्ट करण्यासंदर्भातील सरकारची कटिबद्धता स्पष्ट झाली आहे.

देशातील गावे, शेतकरी आणि गरीबांचे कल्याण हा अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे. रेल्वे संरक्षण निधी आणि रेल्वे सुरक्षा यावरच रेल्वे अर्थसंकल्पाचा भर. रेल्वे अर्थसंकल्पाच्या या अर्थसंकल्पामधील विलीनीकरणामधून वाहतूक क्षेत्राच्या विकासास मोठी चालना मिळेल , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचे ध्येय आहे, तर याचबरोबर, या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. डिजिटल माध्यमामधून आर्थिक व्यवहार करण्यावर देण्यात आलेला भर हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणालेत. शिक्षणापासून ते व्यवसायापर्यंत, कापड उत्पादनापासून ते करबचतीपर्यंत; या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून देशातील प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत याकरिताच अरुण जेटली यांनी उत्तम अर्थसंकल्प मांडला आहे. असे सांगताना मोदी म्हणाले, देशातील गरीबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा अर्थसंकल्प समर्पित आहे. अर्थव्यवस्थेला धक्का देणार्‍या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा पहिला अर्थसंकल्प विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज अखेर संसदेत सादर केला. वैयक्तिक प्राप्तिकरदात्याला सवलत, राजकीय पक्षांच्या निनावी देणग्यांवर अंकुश, संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद आणि नोटाबंदीबाबत जोरदार समर्थन जेटली यांनी अर्थसंकल्पात केले.