डान्सबारबाबत बाजू मांडण्यात सरकार कमी पडले-धनंजय मुंडे

0

मुंबई- डान्सबारसंदर्भात राज्य सरकारच्या अटी सुप्रीम कोर्टाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबई आणि राज्यात पुन्हा डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतरही जनमताचा रेटा आणि सरकारवर उडालेली टीकेची झोड यामुळे राज्य सरकारने २०१६ मध्ये डान्सबारसंदर्भात नवा कायदा आणला होता.

दरम्यान यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. डान्स बार बंदीच्या विषयात राज्य सरकार पुन्हा एकदा न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले आहे. या निर्णयामुळे भविष्यात होणा-या परिणामांची चिंता वाटते. सरकारने डान्स बार पुन्हा सुरू होणार नाहीत यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली पाहिजे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.