कासारवाडी :- वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहेत. तसेच वाहनांच्या बाबतीत सध्या वेगवेगळ्या प्रकाराचे संशोधन होत असून त्यातील तंत्रज्ञानात देखील नवनवे बदल घडून येत आहेत. या बदलांशी वाहनचालकांनी जुळवून घ्यायला हवे, असे मत टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सुब्रमण्यम सुर्यनारायण् यांनी व्यक्त केले. कासारवाडी आयडीटीआरमध्ये आयोजित चालक प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
चालकांच्या सुरक्षितेसाठी जनजागृती
टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी. लि., टाटा मोटर्स लि., स्कील फॉर प्रोग्रेस (एसकेआयपी) आणि इन्सिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च (आयडीटीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने चालक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील ५ ठिकाणी सुमारे ५ हजार चालकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यात चालकांमध्ये सुरक्षित वाहतूक, तणाव व्यवस्थापन, आरोग्य तपासणी, वैद्यकीय अपघात विमा आणि एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती केली जाणार आहे.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी पुण्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत चव्हाण, पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक विलास बांदल, टाटा मोटर्स सीएसआर हेड विनोद कुलकर्णी, टाटा मोटर्स इंजिनियरिंग रिसर्च हेड ज्योतिंद्रन कुट्टी, टाटा मोटर्सचे अमितकुमार गोयल,एसकेआयपीचे जोसेफ स्टॅन्ली, आयडीटीआरचे सचिव प्रशांत काकडे आदी उपस्थित होते.