तब्बल ३०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात

0

नौगाम: सीमारेषेपलीकडे २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कराकडून याची माहिती देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज शनिवारी लष्कराच्या जवानांनी ठार केले. त्यानंतर लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली.

मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी दिली. लष्कराच्या जवानांनी ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मॅगझिन, एक पिस्तुल, हातगोळे आणि दोन एके असॉल्ट रायफल्स जप्त केले. तसेच भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रूपयेदेखील जप्त करण्यात आले आहे.