नवी दिल्ली । श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यामधली पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतरनागपूरच्या दुसर्या कसोटीमध्ये भारताचा विजय झाला. आता तिसर्या कसोटीमध्येही भारत विजयी झाला, तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी विराट सेना बरोबरी करेल. दिल्ली कसोटी जिंकली तर लागोपाठ 9 कसोटी मालिका जिंकण्याच्या विश्वविक्रमाची भारत बरोबरी करेल. याआधी ऑस्ट्रेलियाने 2005 ते 2008 या कालावधीत हा विक्रम केला होता. श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यावर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार आहे. या दौर्यावेळी ऑस्ट्रेलियाचा विक्रम तोडण्याची संधी भारताला उपलब्ध आहे.
2015 पासून भारत अजिंक्य
2015 साली भारताने श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 असे हरवले. तेव्हापासून भारताने लागोपाठ आठ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांग्लादेशला घरच्या मैदानात लोळवले तर वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानात धूळ चारली. तर 2017मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानात 3-0, असा व्हाईटवॉश दिला होता.