तळोद्यातील बालगृहातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता

नंदुरबार : तळोदा येथील दावल शाह बाबा मुला-मुलींच्या बालगृहातून तीन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तळोदा पोलिसात गुन्हा दाखल
तळोदा येथील बालगृहातून 11 व 13 व 17 वयोगटातील मुलींना कुणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय असून या प्रकरणी बालगृहाच्या अधीक्षिका मनिषा किसन गावीत यांनी तळोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास प्रिया वसावे यांच्याकडे देण्यात आला आहे. 15 एप्रिलच्या रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी त्या बालगृहातून बाहेर पडल्या. त्या परत न आल्याने पोलिसांना कळवण्यात आले.