तिवरे धरणाला भगदाड; सात जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी: कोकणात चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहणाऱ्या तिवरे धरणाला भगदाड पडले. धरणाच्या परिसरातील गावे पाण्याखाली गेली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप २४ जण बेपत्ता आहेत. त्यातील २१ जणांची नावे समोर आली आहेत.

बेंड गावातील घरे पाण्याखाली गेली. वाडीतील ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर २४ जण बेपत्ता झाले आहेत. त्यातील २१ जणांची नावे समोर आली आहेत. अनंत हरिभाऊ चव्हाण ( वय- ६३), अनिता अनंत चव्हाण (५८), रणजित अनंत चव्हाण (१५), ऋतुजा अनंत चव्हाण (२५), दूर्वा चव्हाण (दीड वर्ष), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), नंदाराम महादेव चव्हाण (६५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), रेश्मा रवींद्र चव्हाण (४५), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८), अनुसिया सीताराम चव्हाण (७०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), बळीराम कृष्णा चव्हाण (५५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धाडवे (१८), सुशील विश्वास धाडवे (४८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर (३०).