तूर खरेदीप्रकरणी दोषींविरूद्ध कारवाईचे आश्वासन

0

हिंगोली । जिल्ह्यात तूर खरेदीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. खासदर राजीव सातव यांनी काही शेतकर्‍यांसह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन तूर खरेदीत झालेल्या गैरप्रकाराची व तूर खरेदीपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांच्या मुद्यावर चर्चा केली. शेतकर्‍यांच्या तूर खरेदीच्या प्रकरणाची संपुर्ण चौकशी करून दोेषी विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जे शेतकरी तूर खरेदीच्या निकषात बसतात त्यांनी घोषणापत्र दिल्यावरही त्यांची तूर खरेदी झालेली नाही.

त्या शेतकर्‍यांची तूर खरेदीसाठी प्रयत्न करण्यात येतील. असे आश्‍वासन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खासदार राजीव सातव व शिष्टमंडळाला दिले. ज्या शेतकर्‍यांची नावे यादीत नाहीत, त्यांनी घोषणापत्र दाखल केले नाही. अशा शेतकर्‍यांची तूर खरेदी केली गेली, मात्र घोषणापत्र देऊनही अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित आहेत. त्या शेतकर्‍यांना शासनाने न्याय द्यावा, अशी भूमिका खासदार सातव यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडली. शेतकर्‍यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष उपविभागीय अधिकार्‍यामार्फत तुरीची तपासणी करून पंचनामे केले.