‘थर्टी फर्स्ट’ला बाजारपेठा २४ तास सुरु ठेवा; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई- नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. दरम्यान बिगर रहिवासी भागातील बाजारपेठा २४ तास खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथील बिगर रहिवासी भागात असलेल्या बाजारपेठा नविन वर्षांच्या निमित्ताने २४ तास खुल्या ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी. त्यामुळे लोकांना खुलेपणाने नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद घेता येईल. आपली ही आग्रहाची विनंती असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.