श्रीनगर : गेल्या महिन्यात काश्मीरमधील सहा पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणार्या दहशतवाद्यांमधील बशीर लश्करी या खतरनाक दहशतवाद्याला शनिवारी भारतीय सैन्यांनी यमसदनी धाडले. या कारवाईमुळे भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना मोठा दणका दिला असल्याचे मानले जात आहे. काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांचा पर्याय बनलेल्या बुरहान वानी आणि सबझार अहमद बटच्या खात्म्यानंतर भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश असल्याचे मानले जाते. सकाळी सुरक्षा दलांनी लष्करी आणि इतर 3 दहशतवाद्यांना एका घरात घेरले होते. पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे जवानांना ऑपरेशन राबवण्यात मोठी अडचण येत होती. अशा परिस्थितीतही जवानांना बशीर लष्करीला ठार करण्यात यश मिळाले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेसमवेत दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.
शोध मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजून गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी स्वत:च्या बचावासाठी स्थानिक लोकांचा मानवी ढाल म्हणून उपयोग करत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरूच ठेवले आहे.
प्रवक्ता,भारतीय सैन्य दल