दिल्लीच्या तुघलकाबाद परिसरात वायूगळती

0

नवी दिल्ली। तुगलकाबाद परिसरात एका कंटेनर डिपोमध्ये वायूगळती झाल्याची झाल्याची घटना समोर आली आहे. या वायूगळतीमुळे राणी झांसी सर्वोदय कन्या विद्यालयाच्या 320 विद्यार्थिनी अत्यावस्थ असल्याची माहिती उपप्राचार्या रेणु रामपाल यांनी दिली आहे.

बाधित विद्यार्थिंनींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता विद्यार्थिनींनी डोळ्यात जळजळ होत असल्याची तक्रार केली. काही विद्यार्थिनी वर्गातच बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पालकांनी दिलेली महिती अशी की, वायूगळती झाल्याचे समजताच ते शाळेत पोहोचले असता काही विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. बहुतांश विद्यार्थिनींनी डोळ्यात आणि घशात जळजळ होत असल्याचे सांगितले. बाधित विद्यार्थिनींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.