नवी दिल्ली : दिल्लीत शुक्रवारी निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या कोल्हापूरातील शेतकऱ्याचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरुन पडून करण संत (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपासक करीत आहेत.
#UPDATE Amit Sharma, Additional Dy Commissioner of Police, Central Delhi: Kiran Santapa*, a 52*-year-old farmer from Maharashtra’s Kolhapur district, has died after falling off the 3rd floor of Ambedkar Bhawan in Delhi's Paharganj, earlier today. Investigation underway. https://t.co/Y2McxlUes9
— ANI (@ANI) December 1, 2018
दिल्लीमध्ये शुक्रवारी देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले करण संत (वय ४५) हे देखील मोर्चासाठी दिल्लीत गेले होते. शनिवारी सकाळी पहाडगंज येथील आंबेडकर भवनातील तिसऱ्या मजल्यावरुन पडून करण संत यांचा मृत्यू झाला. करण संत हे तिसऱ्या मजल्यावरुन खाली कसे पडले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी सांगितले.