दिल्ली अग्नितांडव: इमारतीच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल !

0

नवी दिल्ली: दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु आहे. एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. दरम्यान या प्रकरणी इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण देशात या घटनेवरून दु:ख व्यक्त केले जात आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. अजूनही मृतांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.