दिव्यांगमुक्त भारतासाठी सर्वांनी सहभाग द्यावा

0

मुंबई। देशाला दिव्यांगमुक्त करण्याच्या कामामध्ये रत्न निधि चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वरळी यांचे कार्य खुप मोठे असून दिव्यांगासाठी माझे काही देणे लागते या भावनेने प्रत्येकाचा या अभियानात सहभाग महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

रत्न निधि चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने 50 अपंग व्यक्तींना जयपूर फूटचे वितरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मंगळवारी महापौर निवासस्थान, शिवाजी पार्क, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, स्टेट बॅक ऑफ इंडियाचे संचालक व्ही. रामलिंग हे मान्यवर उपस्थित होते. रत्न निधि चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वरळी यांचा स्तुत्य असा हा उपक्रम असून सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या या मंडळीना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा.