धुळे । दिव्यांग बांधवांना समाजात न्याय, प्रतिष्ठा, सन्मान देण्यासोबतच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी भारत सरकारतर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्या माध्यमातून दिव्यांगांचे मनोबल उंचवावे, आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. यासाठी सामाजिक न्याय विभाग सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. जिल्हा संकुलात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना विविध उपकरणाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागातर्फे दीन-दलित, आदिवासी, कष्टकरी, समाजापर्यंत कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जणांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने विशेष नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे, पालक मंत्री ना. दादा भुसे, जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खा. डॉ. हीना गावित, मधुकर गर्दे, माजी आ. प्रा. शरद पाटील, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, हिलाल माळी, अनुप अग्रवाल, संजय पगारे, शशीकांत वाघ, पंकज साळुंके आदी उपस्थित होते.