दुख:द घटना: दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद

0

चंदेल: मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.  या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर अंधाधूंद गोळीबार केला. आज गुरुवारी ३० रोजी सकाळी ही घटना घडली.

मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात म्यानमार सीमेलगतच्या भागात दहशवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांना लक्ष्य केले आहे. स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या शोध सुरु आहे. त्याचबरोबर भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.