जळगाव – जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रियेला सकाळी ७.३० वाजेपासून सुरवात झाली. पहिल्या दोन तासात ११.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत २२.२५ टक्के मतदान झाले. तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४८.३४ टक्के मतदान झाले. यात जळगाव तालुक्यात ४५.४४, जामनेर धरणगाव ५४, एरंडोल ४९.७१, पारोळा ५४.६८, भुसावळ ४४.९०, मुक्ताईनगर ५५.४०, बोदवड ५०.३५, यावल ४८.२५, रावेर ५७.६७, अमळनेर ५२.५७, चोपडा ५१.४४, पाचोरा २७.५४, भडगाव ४७.२८, आणि चाळीसगाव तालुक्यात ४९.१४ असे एकुण ४८.३४ टक्के मतदान झाले आहे.