देशात असहिष्णूता वाढली – माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

0

नवी दिल्ली : देशात मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णूता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांची दरी वाढलेली आहे. याबद्दल देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुखर्जी म्हणाले, देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. त्याच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. असेही मुखर्जी यांनी म्हंटले आहे.