देशात एका दिवसात ४,४५४ रुग्णांना कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच मिळत आहे. एका दिवसात भारतात४,४५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार दिवसभरातील करोना आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत दोन लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २,६७,५२,४४७ इतकी झाली आहे.देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच बघायला मिळाला. एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा दुर्दैवी जागतिक विक्रमही भारताच्या नावावर नोंदवला गेला. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. तर करोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून, गेल्या २४ तासांत ४,४५४ रुग्णांना करोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत.