मुंबई: मध्यप्रदेश, गुजरात राज्यात राजकीय भूकंप घडत असून, मध्यप्रदेश मधील कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. यावर शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. देशात सध्या विरोधी पक्षांची सरकारं खिळखिळी करणाऱ्या व पाडणाऱ्या ‘राजकीय विषाणू’ ने धुमाकूळ घातला असल्याचा चिमटा काढला आहे. मध्यप्रदेश, गुजरात मधील आमदारांसाठी भाजपने किती किमत मोजली हे समजायला हवे, अशी मागणी केली शिवसेनेने केली आहे.
पुढे आपल्या अग्रलेखात अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला. हा विषाणूमहाराष्ट्र राज्यात नाकाम ठरला असल्याचे म्हटले आहे.महाराष्ट्र राज्यात हा विषाणू चालला नाही आणि त्यांच्यावरच तो उलटला. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करता येत नाही याची खात्री पटताच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो प्रयत्नही फसला. अर्थात तरीही सरकार पाडण्याचा किडा वळवळत राहिला असल्याचे म्हटले आहे..
मध्य प्रदेशात कर्नाटक घडते की महाराष्ट्र हे पुढील घडामोडींवर ठरेल. कोण कोणत्या चाली खेळतो, त्यात कोणाला किती यश मिळते, या चाली यशस्वी होतात की उलटतात, राजकीय पटावरची किती प्यादी इकडून-तिकडे आणि तिकडून-इकडे होतात यावर बरंच काही अवलंबून असेल. पुन्हा यातही न्यायालयाचा भाग आलाच तर न्यायालयाचा हातोडा कोणाच्या टाळक्यात बसतो हेदेखील महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेच्या अग्रलेखावर भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.