पिंपरी-काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष होता. आज 70 वर्षांनी या देशात काँग्रेस एवढे वाईट हाल कोणाचेच झाले नाहीत. काँग्रेस सगळ्यांना एकत्र करून आपल्या विरोधात लढत आहे. दोन काँग्रेसचे तर काय वर्णन करावे. यांच्यापेक्षा काळू-बाळूचा तमाशा बरा, त्यातून काहीतरी करमणूक तरी होते. हा तमाशा फारच विचित्र आहे, असा हल्लाबोल पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर केला.
आजमितीला देशात दोन हजार 40 राजकीय पक्ष देशात आहेत. तर, महाराष्ट्रात 198 राजकीय पक्ष आहेत. नावानिशी एक पार्टी आहे. त्यापैकी भाजप-शिवसेना म्हटले की लोक ओळखतात. काँग्रेसचे विचारले की कुठला काँग्रेसच्या शरद पवार यांच्या काँग्रेसचा का? अजित पवार यांच्या काँग्रेसचा, पार्थच्या, परमार्थच्या की कुणाच्या काँग्रेसचा असा प्रश्न पडतो. कारण यांच्या प्रत्येकाच्या नावाने यांची पार्टी आहे, अशी टीकाही बापट यांनी केली.