चोपडा : तालुक्यातील विष्णापूर येथील माहेर आलेल्या विवाहितेने माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
चोपडा तालुक्यातील विष्णापूर येथील माहेर असलेल्या शीतल मुकेश पाटील (25) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मुकेश लोटन पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर पती मुकेश याने विवाहितेला माहेरहून दोन लाख रुपये आणावे यासाठी शारीरीक व मानसिक छळ केला. सासू, सासरे, पुतण्या आणि नणंद यांनी पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी अडावद पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर पती मुकेश पाटील, सासरे लोटन हरी पाटील, सासू बेबीबाई लोटन पाटील, पुतण्या करण अनिल पाटील (सर्व रा.दुसाणे, ता.साक्री, जि.धुळे) आणि नणंद शारदा जगदीश सूर्यवंशी (रा.तडोदा, जि.नंदुरबार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नशीर तडवी करीत आहे.