धक्कादायक:एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

0

रांची-राजधानी दिल्लीच्या बुराडी येथील सामूहिक आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील सहा जाणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडच्या हजारीबाग परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कर्जबाजारीपणामुळे या ६ जणांनी आत्महत्या केली. सहापैकी पाच जणांनी फास घेवून आपलं जीवन संपवलं तर एकाने घराच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआने दिली आहे. मृतांमध्ये आई-वडील, मुलगा-मुलगी आणि नातवंडांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.