आठव्या फेरी अखेर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्नाताई रघुवंशी 5 हजार मतांनी पुढे
नंदुरबार (रवीद्र चव्हाण) । अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या मानल्या जाणार्या नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकांच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्याकडे असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आठव्या फेरी अखेर काँग्रेसची आघाडी कायम असून ते विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. आठव्या फेरीअखेर काँग्रेसच्या रत्नाताई रघुवंशी या 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी हे पहिल्या फेरीपासून पिछाडीवरच असून मतमोजणीची अखेरची फेरी बाकी आहे. त्यामुळे विजयाचे चित्र जवळपास स्पष्ठ झाल्याचे दिसतेय. तिसर्या फेरी अखेर रत्नाताई रघुवंशी यांनी 2783 मतांची आघाडी घेतली होती. त्यांना 11 हजार 458 मते होती तर भाजचे उमेदवार डॉ. रविंद्र चौधरी यांनी 9 हजार 284 मते होती. तसेच दुसर्या फेरी अखेर रत्नाताई रघुवंशी यांनी 1744 मतांची आघाडी घेतली होती. तर पहिल्या फेरीअखेर रत्नाताई रघुवंशी या 675 मतांनी पुढे होत्या. त्यांना 5429 मते होती तर भाजपच्या डॉ.रवींद्र चौधरी यांना 4754 मते पहिल्या फेरीअखेर मिळाली होती. आठव्या फेरीपर्यंत अंतर वाढत जाऊन रत्नाताई रघुवंशी यांनी 5 हजार मतांनी आघाडी घेतली.
Prev Post