मुंबई- नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ५ जानेवारीला राज्य सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी संप करणार आहे.
येत्या जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून ६० वर्षे करावी, सरकारच्या विविध विभाग आणि खात्यांमध्ये रिक्त पडे तातडीने भरावीत यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.
राज्यातील जवळपास दीड लाख अधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहे असा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने केला आहे. महासंघ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवासुविधा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहे. पण आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे अधिकारीवर्गात नाराजी आहे.