नवापूर: सध्या जगात कोरोना सारख्या महामारीने घेरले असून प्रत्येक व्यक्तीने या महामारीपासून बचावासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र खबरदारी घेतली जात नाहीये. यात नवापूरचा नागरिक देखील मोडला जातांना दिसून येत आहे पोलिस प्रशासन आपली जवाबदारी अत्यंत कडेकोटपणे पालन करत असले तरी भाजी मार्केटमध्ये मात्र सुरक्षिततेचा भाव दिसत आहे. नगरपालिकेजवळ भरणाऱ्या भाजी बाजार कमी असल्याने त्याचे स्थलांतर करावे अशी मागणी होत आहे.