बंगळूर-सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी आणि यरझरवी येथे राहणारे १४ जण नातेवाईकाचे निधन झाल्याने गोकाक धबधबाजवळील गावात गेले होते. काल रात्री सर्व जण गावी परतण्यासाठी निघाले. त्यावेळी गोकाक तालुक्यात संखेश्वर-नारगुंड महामार्गावर एका ट्रॅक्टरला कारने धडक दिली. या भीषण अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला.
ऊसाने भरलेला ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा अपघात झाला. अंधारात कार चालकाला हा ट्रॅक्टर दिसला नाही आणि हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रॅक्टर चालकाने नियमांचे पालन केले नव्हते. ट्रॅक्टरच्या मागील लाईटही ऊसामुळे झाकले गेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.