निर्बंधासह जळगाव जिल्हा अनलॉक

जळगाव – राज्य शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात असलेला जळगाव जिल्हा आता सकाळी ९ ते रात्री ९ या निर्बंधासह अनलॉक करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहे. अनलॉकच्या या प्रक्रियेत सर्व प्रकारचे व्यवहार नियमीत सुरू राहणार असले तरी लग्न, अंत्यविधी, क्रीडा स्पर्धा, शॉपिंग मॉल्स, थिएटर, हॉटेल्स, बार यांना संख्या आणि वेळेचे निर्बंध कायम राहणार आहेत.