निवडणूक आयोग म्हणेल तेच खरे कसे?

0

गांधीनगर : निवडणूक आयोग म्हणेल तेच खरे असे होऊ शकत नाही. उमेदवाराने इव्हीएमसंदर्भात तक्रार केल्यास निवडणूक आयोगाकडून व्हीव्हीपॅटमधील मतदान केल्याच्या पावत्यांची पुन्हा मोजणी करायलाच हवी अशी ठाम भूमिका घेत पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल याने आयोगालाच आव्हान दिले आहे.

मतदान यंत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत हार्दिकने सुरुवातीपासूनच भाजपला टार्गेट केले होते. निवडणूक आयोग आणि भाजपची हातमिळवणी झाल्याचा आरोपही हार्दिकने केला होता. अखेर मतमोजणीनंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हार्दिकने निवडणूक आयोगावर निशाणा साधला. काँग्रेसचा एक मजबूत विरोधीपक्ष म्हणून उदय झाला आहे. ते जनतेसाठी कशी भूमिका बजावतात हे आम्ही पाहणार आहोत, असेही हार्दिक म्हणाला.