इस्लामाबाद । मुंबईवर 2008 मध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनीच घडवून आणल्याची कबुली पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमुद अली दुराणी यांनी दिली. या हल्ल्यात पाक सरकारचा कोणताही सहभाग नव्हता, असा दावाही दुराणी यांनी केला.
दिल्लीतल एका संस्थेने आयोजिलेल्या आशियाई सुरक्षा परिषदेत दुराणी बोलत होते. 26/11 चा दहशतवादी हल्ला हे सीमेपलीकडील दहशतवादाचेच उदाहरण आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनीच हा हल्ला घडविला.