पाक लष्कराला भारतीय सैन्यांने शिकविला धडा; ७ चौक्या उध्वस्त

0

नवी दिल्ली-वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ, राजौरीमधील नागरीवस्त्यांवर गोळीबार, तोफांचा मारा सुरु होता, त्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यांनी कारवाई केली.

पाकिस्तानच्या या गोळीबारात काल एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अनेक नागरीक जखमी झाले होते. भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचीही जिवीतहानी झाली आहे. पाकिस्तानने आपले तीन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूँछ आणि राजौरी सीमेवरील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने सोमवारी केलेल्या तोफ गोळयांच्या माऱ्यात तिघांचा मृत्यू झाला २४ जण जखमी झाले. त्यामुळे भारतीय सैन्याकडून आज अशा प्रकारची जोरदार कारवाई करण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमधील राखचीकरी आणि रावलकोट भागातील सात चौक्या उद्धवस्त झाल्या. यात तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचे भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.