पाच मुलांचे नरबळी शेजार्‍यांनी रोखले!

0

कोल्हापूर । बेळगावात महालय अमावास्येच्या रात्री पाच मुलांचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचे कारस्थान भडकल गल्लीत उघडकीस आले. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, अन्य चारजण पळून गेले आहेत. शिरीना जमादार असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, मसाबी मुल्ला, जावेद मुल्ला, फारूक मुल्ला आणि सोना मुल्ला अशी कटातील अन्य सहभागींची नावे आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

बालिकेच्रा ओरडण्राने बिंग फुटले
गौस पिरजादे यांच्या घरात मुल्ला कुटुंबीय भाड्याने राहत होते. पिरजादे यांची चौदा महिन्यांची बालिका खतिजा सकाळपासून गायब होती. म्हणून तिचा शोध घेण्यात येत होता. दुपारी दीड वाजता खतिजाच्या रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी बंद घराचा दरवाजा काढून आजूबाजूचे लोक घरात गेले असता नरबळीचा प्रकार उघडकीस आला.

घरातच आठ फूट खोल खड्डा
कटातील सहभागींनी बालिकेसह पाच मुलांचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचा कट रचला होता. नरबळी दिल्यास मोठ्या प्रमाणावर गुप्तधन मिळते, असे मांत्रिकाने सांगितले होते. बळी देण्यासाठी घरातच आठ फूट खोल आणि आठ फूट रुंद खड्डा खोदला होता. एका घागरीत लिंबू, कुंकू, उदबत्ती, फळे व साहित्य ठेवले होते. बळी देताना मुलांना घालण्यासाठी काळे मुखवटेही आणले होते. पण, खड्डा खोदताना आवाज आल्यामुळे आणि लहान मुलीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारचे लोक जमा झाले आणि हा कट फसला. तीन वर्षांपासून मुल्ला कुटुंबीय त्या घरात भाड्याने राहत होते. अमावास्येच्या दिवशी घर रिकामे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या गुन्ह्याची नोंद मार्केट पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.