धानोरा । धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासुन जलस्त्रोतांमधील पाण्याची पातळी खालावत असून संपुर्ण सातपुडा पर्वतावरिल शेती शिवार आणि गावांवर जलसंकट ओढावले आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत असून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन उन्हांचा तडाखा चांगलाच जाणवत असून त्याची झळ पिकांना बसत आहे.
चिंचपाणी धरण अपूर्णावस्थेत : धानोरा परिसरातील देवगाव, पारगाव, बिडगाव, मोहरद, कुंडयापानी, चांदण्या तलाव , वरगव्हण, या शेती शिवाराला फायदेशीर ठरणारे धरण आहेत मात्र त्यांच्यात अल्पत पाणीसाठा असल्याने, तसेच धरणांची उर्वरित कामे अपुर्ण राहिल्याने त्याचा उपयोग नसल्याचे चित्र आहे. या परिसराला वरदान ठरणारे चिंचपाणी धरणाचे काम आजही अपूर्णावस्थेत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच या धरणाची आठवण राजकीय पुढार्यांना होते, सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामस्थांमधून पुढार्यांविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. धानोरा परिसराला भविष्या च्या दुष्टीने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चिंचपाणी, धरण वगळता कोणतेही धरण नाही, त्यामुळे चिंचपाणी धरणाचे उर्वरित राहीलेले काम होणे अत्या आवश्यक आहे.एप्रिल महिण्यातच तापमानाने चाळीशीच्या वर मजल मारली असुन अजुन मेहिटचा तडाखा बाकी आहेत, चोपडा, यावल, रावेर हे तालुके केळी साठी प्रसिंध्द असुन केळी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड या भागात केली जाते.याच महिन्यात केळी बागा उन्हाने करपू लागल्या असून केळीचे घड काळी पडत आहेत, तर शेतकरी मिळेल त्या साधनाने त्यावर आच्छादन घालण्याचा प्रयत्न करित आहेत.