पालघर : केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे. समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.
मुंबईतल्या पाच जणांचा तीन जून रोजी रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला होता. पर्यटनासाठी गेलेल्या बोरीवलीतील डिसुजा कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला.