पालघर जिल्ह्यामधील 71 गावांना पेसाचा दर्जा

0

पालघर । पालघर जिल्ह्यातील 71 गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या 71 गावांमध्ये वसई, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांचा समावेश आहे. याआधी पालघर तालुक्यातील 21 गावांना एप्रिल मध्ये पेसा दर्जा प्राप्त झाला होता. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकासाला चालना मिळावी तसेच आदिवासींच्या स्वशासन व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पाडे, पाडयांचे समुह वाडी, वाड्याचे समूह वस्ती, पेसा गावे करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पालघर जिल्ह्यातील 71 गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

ग्रामसभांना विशेष अधिकार
विशेष म्हणजे पेसा कायद्याचे अधिकार प्राप्त झालेल्या गावांना स्वतंत्र ग्रामसभा घेता येणार आहे. तसेच पेसा अंतर्गत त्या गावांना स्वतंत्र ग्रामसभा घेणे, स्वताचा ग्रामसभा कोष, लघु पाणी साठयाचे नियोजन करणे, गौण खनिजांचे नियोजन, अनुसूचित जमातीच्या जमिनींचे अन्यास्क्रमण केलेली जमीन परत मिळवूण देण्याचे अधिकार देण्यात आला आहे. पेसा अर्थातच पंचायत क्षेत्र विस्तार या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रामध्ये मोडत असलेल्या ग्रामपंचायतीतील पाड्यांना आणि ग्रामसभाना त्यांचे विशेष अधिकार आणि नैसर्गिक साधन संपत्तीची खरी मालकी तसेच तिचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार मिळणार आहे. यामध्ये मोडणारे गावे खर्‍या अर्थाने स्वंयपूर्ण होणार आहेत.

पालघरमध्ये 87 पेसा ग्रामपंचायती
देशातील अनुसूचित शेत्रातील गावांना पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 ने स्वशासनाचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच या कायद्या नुसार आदिवासी बांधवांची संस्कृती, रुदी, प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करण्यासाठी आदिवासी विकासाला चालना मिळाली. राष्ट्रपतींनी अनुसूचित क्षेत्रामध्ये स्माविष्ट केलेले गावांना हा कायदा लागू केला. त्यानुसार या कायद्यांतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये 87 पेसा ग्रामपंचायती व 150 महसूल गावे व 603 पडे, वाडी, वस्ती आहेत.