मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. मनमाड, पंढरपूर, सांगलीमध्ये शनिवारी झालेल्या वादळीवार्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आणि व्यापार्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मनमाडमध्ये पावसामुळे कांदा व्यापार्यांचं शेड कोसळले. सांगलीतील जत तालुक्यात एका शेतकर्याचे तब्बल 23 लाखाचे नुकसान झाले आहे.