मुंबई : राज्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागाला पुराचा अधिक फटका बसला आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहे. अनेक घरे पुरामुळे पडलेले आहेत. दरम्यान आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी 6 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मदतीत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हजार 88 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ 75 कोटी, पडलेली घरे पूर्णपणे बांधून देणार आहोत, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटी रुपये देण्याचा निर्णय आहे. तर तात्पुरत्या छावण्यांसाठी 27 कोटी, जनावरांसाठी 30 कोटी, स्वच्छतेसाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.