पोलीसांना खासगी सुरक्षा रक्षक म्हणून राबवू नका

0

उच्च न्यायालयाने सरकारले फटकारले

मुंबई । राज्यभरातील पोलिसांना खासगी सुरक्षारक्षकांप्रमाणे राबवू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. सध्या पोलीस सुरक्षा पुरवण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची केस नीट तपासून पाहा. १० ते १५ वर्षांपूर्वी सुरक्षा पुरवलेल्यांना आताही पोलीस सुरक्षेची खरेच गरज आहे का? हे तपासून घ्यायला हवे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

वैयक्तीक सुरक्षेसाठी पोलिसांना का जुंपता?
खरेच गरज असलेल्या दुर्मिळ प्रकरणांतच पोलीस सुरक्षा पुरवायला हवी. अन्य कारणांसाठी खासगी सुरक्षारक्षक पुरवणार्‍या एजन्सी आहेत. इच्छुक व्यक्ती त्यांचा लाभ घेऊ शकतात, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. वर्षानुवर्षे पोलीस सुरक्षेची सेवा उपभोगणार्‍या मात्र त्याकरताची बिलं थकवणार्‍यांविरोधात सनी पुनमिया यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यात यावा. या याचिकेतील प्रमुख मागण्या आहेत.