पुणे । मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली आहे. त्यामुळे भेंडी, गवार, हिरवी मिरची, काकडी, वांगी, तोतापुरी आणि गावरान कैरीच्या भावात घट झाली आहे. तर बेंगलोर आल्याची आवक न झाल्याने स्थानिक आल्याचे भाव वधारले आहेत. तर पराराज्यातून होणारी आवक घटल्याने बटाटा, मटारचे भाव वाढले असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सुमारे 160 ट्रक भाज्यांची आवक झाली. हिमाचल प्रदेशमधून 250 गोणी मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून तीन ते चार ट्रक कोबी, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओरीसा आणि गुजरात येथून 20 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 3 ते 4 ट्रक गाजर, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 7 ते 8 टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेपाच ते 6 हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आल्याची 1200 ते 1400 पोती, टॉमेटोची साडेपाच ते 6 हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबीची 14 ते 15 टेम्पो, तांबडा भोपळ्याची 8 ते 10 टेम्पो, गवारची 7 ते 8 टेम्पो, मटारची 200 गोणी, भेंडीची 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरचीची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरचीची 5 ते 6 टेम्पो, गावरान कैरीची 7 ते 8, चिंचेची 20 ते 25 पोती, कांद्याची 100 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाट्याची मिळून 25 ते 28 ट्रक, तर लसणाची गुजरात आणि मध्यप्रदेश येथून साडेपाच ते 6 हजार गोणी इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 65-75, बटाटा : 150-180, लसूण : 150-300, आले : सातारी: 300-320, भेंडी : 150-200, गवार : 150-200, टोमॅटो : 40-60, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 150-250, दुधी भोपळा : 50-100, चवळी : 100-150, काकडी : 80-120, कारली : हिरवी 200-220, पांढरी : 90-100, पापडी : 140-150, पडवळ : 150-160, फ्लॉवर : 60-100, कोबी : 30-50, वांगी : 60-120, डिंगरी : 100-120, नवलकोल : 70-80, ढोबळी मिरची : 120-180, तोंडली : कळी 200-220, जाड : 90-100, शेवगा : 160-200, गाजर : 80-200, वालवर : 120-140, बीट : 60-80, घेवडा : 300-400, कोहळा : 100-120, आर्वी : 200-250, घोसावळे : 140-160, ढेमसे : 100-150, भुईमूग : 300-350, पावटा : 350-400, मटार : परराज्य : 500-520, स्थानिक : 550, तांबडा भोपळा : 40-80, कैरी : तोतापुरी : 200-220, गावरान : 150-200, चिंच : (अखंड) : 300-320, फोडलेली : 600-650, सुरण : 230-250, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.
फुलांच्या दरात 10 टक्के वाढ
तीव्र उन्हामुळे फुलांचे उत्पादन घटले असून गुलटेकडी मार्केटयार्डात फुलांची आवक साधारणच आहे. आवकेच्या तुलनेत मागणीही बर्यापैकीच आहे. परिणामी एकूण फुलांच्या दरात साधारण 10 टक्के वाढ झाली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी डॉ. आंबेडकर जयंतीमुळे फुलांना चांगली मागणी होती, अशी माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
कलिंगडाची मागणी वाढली
उन्हामुळे कलिंगड, खरबुज, डाळींब, संत्री आणि मोसंबीला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक होत असल्याने या फळांचे भाव स्थिर आहेत. केवळ खरबुजाच्या भावात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. भाव स्थिर असले तरी लिंबामध्ये हिरव्या ऐवजी पिवळ्या लिंबाला अधिक मागणी आहे. आंब्यामध्ये अक्षय तृतीयेला अपेक्षित आवक होत नाही. त्या तुलने मागणी अधिक असल्याने आंब्याचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी येथील फळबाजारात अननस 7 ट्रक, मोसंबी 40 टन, संत्री 8 टन, डाळींब 30 ते 35 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबाची 5 हजार गोणी, चिक्कू2 हजार डाग, पेरु 80 ते 100 क्रेटस, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबुज 20 ते 25 टेम्पो, सफरचंद 800 ते 1 हजार पेटी, आंबा 8 ते 10 हजार पेटी, द्राक्षे 5 ते 6 टन इतकी आवक झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : 200-1700, अननस (डझन) : 70-280, मोसंबी : (3 डझन) : 180-350, (4 डझन) : 60-150, संत्रा : (3 डझन) 200-400, (4 डझन) : 100-220, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-130, गणेश 10-25, आरक्ता 10-40, कलिंगड : 5-10, खरबुज : 10-20, पपई : 5-15, चिक्कू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-400, सफरचंद : सिमला (25 किलो) : 1500-1800, काश्मीर डेलीशियस (15 किलो) 1000-1300, किन्नोर : ( 25 किलो) 2000-2500, सिमला : (25 किलो) 1500-1800, द्राक्षे : तासगणेश (15 किलो) 700-800, सुपर सोनाका (15 किलो) : 1200-1300, थामसन (15 किलो): 500-600, आंबा रत्नागिरी कच्चा हापूस (4 ते 8 डझन) 1500 ते 3500, तयार (4 ते 8 डझन) – 2000 ते 4500, कर्नाटक (कच्च्या आंब्याचे भाव) : लालबाग 40- 70, बदाम 50-60, कर्नाटक : पायरी (2 डझन) 250-450, हापूस (2 डझन) 450-700, तोतापुरी 50-40.
पालेभाज्यांच्या भावात घसरण
मार्केटयार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे कोथिंबिर, मेथीसह सर्व पालेभाज्यांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरण झाली आहे. कोथिंबिर, मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार अनुक्रमे 3 ते 12 आणि 10 ते 14 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कोथिंबिर आणि मेथीच्या जुडीला अनुक्रमे 10 ते 20 रुपये, तर मेथीची 15 ते 20 रुपये मोजावे लागत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची तब्बल अडीच लाख जुडी, तर मेथीची 70 हजार जुडी आवक झाली. आवक वाढल्यामुळे सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांच्या शेकडा जुडीमध्ये 100 ते 200 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : 10-40, गुलछडी : 80-120, बिजली : 10-40, कापरी : 20-30, ऑस्टर : 15-20, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 10-20, ग्लडिएटर : 10-20, गुलछडी काडी : 15-40, डच गुलाब (20 नग) : 30-60, लिलिबंडल : 3-6, जर्बेरा : 10-30, कार्नेशियन : 60-120, मोगरा : 200 – 350.
मासळीचे दर पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो)
पापलेट : कापरी : 1500, मोठे : 1400, मध्यम : 1100, लहान : 900, भिला : 650, हलवा : 650-700, सुरमई : 650-700, रावस लहान : 550, मोठा : 750, घोळ : 600, करली : 280, करंदी (सोललेली ) : 320, भिंग : 360, पाला : 600-1200, वाम : 320-550, ओले बोंबील : 160, कोळंबी : लहान : 200, मोठी : 400-480, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1400, मोरी : 200-280, मांदेली : 120, राणीमासा : 200, खेकडे : 200, चिंबोर्या : 400. खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 200, नगली : 280, तांबोशी : 400, पालू : 240, लेपा : 200, शेवटे : 240, बांगडा : 160-200, पेडवी : 100, बेळुंजी : 140, तिसर्या : 180, खुबे : 160, तारली : 120. नदीची मासळी : रहू : 160, कतला : 180, मरळ : 480, शिवडा : 200, चिलापी : 60, मांगूर : 150, खवली : 240, आम्ळी : 160, खेकडे : 240, वाम : 550. मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे : 440, खिमा : 440, कलेजी : 480. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 580, डझन : 84 प्रति नग : 7, इंग्लिश : शेकडा : 367 डझन : 48 प्रतिनग : 4.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 200-1000, मेथी : 400-1000, शेपू : 300-600, कांदापात : 400-600, चाकवत : 500-600, करडई : 400-500, पुदिना : 100-200, अंबाडी : 400-500, मुळे : 500-800, राजगिरा : 500-600, चुका : 500-800, चवळई : 500-600, पालक : 500-700, हरभरा गड्डी : 400-600.
मासळीचे महागली
देशाच्या पुर्व व पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीची आवक घटल्यामुळे भाव वधारले आहेत. गणेश पेठेतील घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 9 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 150 ते 200 किलो आणि नदीतील मासळीची सुमारे 1 ते दिड टन इतकी आवक झाली. तर, आंध्रप्रदेशातील रहु, कतला, सीलन आदी प्रकारच्या मासळीची सुमारे 10 ते 12 टन इतकी आवक झाली असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तसेच चिकन, मटण व गावरान अंड्याचे दर स्थिर असून, इंग्लिश अंड्याच्या दरात मात्र शेकड्यामागे 50 रुपयांनी वाढ झाली आहे.