फैजपूर शहर शेतकर्‍यांच्या मोर्चाने दणाणले

0

भाजपा सरकारविषयी मोर्चेकर्‍यांकडून जोरदर घोषणाबाजी

फैजपूर- रावेर-यावल तालुक्यासह सर्वच तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त व परतीच्या पावसाने तालुक्यातील कापणीस आलेले पिके ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन सर्वच पिके अतिपावसाने नष्ट झाली आहेत. पंचनामे करून शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढून प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शेकार्‍यांचा मागणीचे निवेदन देण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सुभाष चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. फसवणीस सरकर हाय हाय, फेकू सरकार चले जाव आदी घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणला.

शेतकरी हिताचा तातडीने घ्यावा निर्णय
निवेदनाचा आशय असा की, रावेर-यावल भागातील शेतकरी हा आधीच दुष्काळाने त्रस्त झालेला आहे त्यातच यावर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके नाहीशी झालेली आहे. ज्वारी, मका कंपनीला आली होती तर कापूस वेचणीवर आला होता. शेतकर्‍यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी फारच आर्थिक अडचणीत आलेला आहे. सततच्या नापिकी दुष्काळ, अतिवृष्टी ,चक्रीवादळ, गारपीट यासह अनेक कारणांनी शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दाबला गेला असल्याने पूर्णतः आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना शासनाकडून तात्काळ दुष्काळी मदत मिळावी व शेकार्‍यांचा हिताचा योग्य निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात या मागण्यांचा समावेश
शेतकर्‍यांना शेती पंपाचे सर्व थकीत वीजबिल बिल माफ करावे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करावी, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सातबारा वरील पिकपेर्‍या प्रमाणे हेक्टरी रुपये पन्नास हजार मदत मिळावी, पावसामुळे सर्वच प्रकारचा गुरांचा चारा नष्ट झाल्याने गुरांना चार्‍यासाठी शेतकर्‍यांना गुरांच्या चार्‍याची मदत मिळणे, नुकताच शासनाने केळी विम्याची घोषणा केली असून त्याची मुदत 9 नोव्हेंबर 2019 दिलेली आहे तलाठी व शासकीय यंत्रणा पीक पाहणी करीत असल्याने शेतकर्‍यांना उतारे मिळत नसल्याने केळी पीक विम्याची मुदत वाढ मिळावीत, रावेर-यावल तालुक्यातील मागील वर्षाची दुष्काळ निधी व बोंड अळीचे अद्याप शेतकर्‍यांना वाटप झालेली नसल्याने ते त्वरीत वाटप करण्यात यावे, शेतकर्‍यांना ठिबक सिंचन संच घेताना 45 टक्क्यांऐवजी 80 टक्के पर्यंत अनुदान जाहीर करण्यात यावे, शेतकर्‍यांसोबत शेतमजुरांचा विचार व्हावा व त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी मदतीची तरतूद करण्यात यावी, यासह 14 मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकर्‍यांनी प्रांतअधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना देण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी त्यांच्या भावना मांडल्या.

यांची होती उपस्थिती
माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, रावेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, जिल्हा परीषद सदस्य सुरेखा पाटील, यावल पंचायात समिती काँग्रेस गटनेते शेखर पाटील, फैजपूर पालिका प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी, नगरसेवक कलीम मण्यार, देवेंद्र बेंडाळे, राजीव पाटील, डॉ.सुरेश पाटील, प्रल्हाद बोंडे, किशोर पाटील, तापी परिसर मंडळाचे चेअरमन लीलाधर चौधरी, बापू पाटील, योगेश भंगाळे, रमेश महाजन, लिलाधर चौधरी, केतन किरंगे, चंद्रशेखर चौधरी, रीयाज मेंबर, शेख जफर, सुनील कोंडे, डॉ.गणेश चौधरी, रामा चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, माजी नगरसेविका निलिमा किरंगे, प्रभात चौधरी, अजित पाटील, संजीव चौधरी, भागवत पाचपोळ, कदीर खान, रामराव मोरे यासह असंख्य काँग्रेस राष्ट्रवादी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे यांच्यासह सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.