बँकांना शिवसेना स्टाईल दाखवा

0

धुळे । मुख्यमंत्र्यानी शेतकर्‍याना कर्जमाफीच्या घोषणेसह दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली.मात्र अंमलबजावणी कुठेच नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी नुसतेच ढोल वाजवू नका. आता बँकवाल्यांना शिवसेना स्टाईल दाखवा, अशी सूचनावजा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. खान्देश दौर्‍यानिमित्त झालेल्या महासभेत ते बोलत होते.यावेळी धुळे शहरातील कृषी बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या शेतकरी संवाद मेळाव्यास पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दादा भूसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गोर्‍हे, बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत़े

मोदींनी शेतकर्‍यांची ‘मन कि बात’ ऐकावी
ठाकरे म्हणाले कि,बाळासाहेब असतांना त्यांनी अमरनाथ यात्रेला अडथळा आला तर हज यात्रा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती़.सध्या केंद्र सरकार अतिरेकी हल्ल्यांनंतर केवळ निषेधावरच समाधान मानत आह़े. हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे, म्हणूनच आम्ही मोहन भागवतांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले होत़े त्यामुळे निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला असे आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले.देशाचे पंतप्रधान मन की बात करीत असले तरी शेतकरयांनाही मन आहे, हे त्यांना कळायला हव़े. शिवसेना शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष करीत असून त्यांचा आवाज बुलंद करीत आह़े.

दानवेंवर अप्रत्यक्ष टिका
भाजप नेत्यांचे गोडवे गाणार्‍या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील त्यांनी टिकास्त्र सोडल़े.राष्ट्रवादीचे अजित पवार व रडतात साले म्हणार्‍या रावसाहेब दानवेवर तोंडसुख घेतले.अजित पवार यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याची टिका केल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल़े पवार यांनी केलेले वक्तव्य शेतकरी विसरले नसून जनतेने त्यांना लाथाडले आह़े. भाजपने तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला असल्याने ते शिवसेनेवर टिका करीत असल्याचे ठाकरे म्हणाल़े.शेतकरयांना साले म्हणतात, मग तुमच्यात अन् अजित पवारांमध्ये फरक काय? असा प्रश्न करीत उध्दव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली़.दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या बसवर हल्ला केला़. हिंदुस्थानवर हल्ले होत असतांना निषेध कसला करताय, जा़ घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान धुळ्यात केंद्र सरकारला दिल़े.

विधानसभेत जाब विचारणार
शेतकर्‍यांना कजर्माफी जाहीर करण्यात आली असली तरी शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत़. त्यामुळे किती शेतकरयांना कजर्माफी मिळाली, याचा जाब मुख्यमंत्र्यांना विधानसभेत विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा बँका कजर्वसुलीसाठी शेतकरयांच्या घरासमोर ढोल बडवितात म्हणून आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविल़े.तरीही कजर्माफीचा लाभ दिला गेला नाही, तर मंत्रालयासमोर ढोल बडवू असे ठाकरे म्हणाल़े.कर्जमाफीच्या मागणीची फॅशन झाली आहे, असे वक्तव्य केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केल़े.