मुंबई – बँक संबधित काही कामे असतील तर ग्राहकांनी ते शुक्रवारपर्यंत उरकून घ्यावे कारण शनिवार पासून बँकेला सलग चार दिवस सुट्टी असणार आहे. 28 एप्रिल रोजी चौथा शनिवार, 29 रोजी रविवार, 30 रोजी बुद्ध पोर्णिमा आणि १ रोजी महाराष्ट्र दिन अशा सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. शिवाय 1 मे रोजीही महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे.
सलग चार दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. पैशांची चणचण भासू शकते त्यादृष्टीने ग्राहकांनी आर्थिक व्यवहार शुक्रवार पूर्वी करून घेतल्यास अडचण भासणार नाही. त्यामुळे बँकेचे व्यवहार आटोपून घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस ग्राहकांच्या हातात आहे. असे असले तरी आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे.