मुंबई : बदलापूर येथील बारवी डॅम येथे फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची इर्टिगा गाडी उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
उल्हासनगर मधील एस. एस. टी. महाविद्यालयातील विद्यार्थी फिरण्यासाठी बारवी डॅम येथे बुधवारी गेले होते. त्या दरम्यान भरधाव वेगाने गाडी चालवित असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी सोनावळे गावाजवळील वळणावर उलटली. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी तीन ते चार वेळा उलटली. या अपघातामध्ये नुपम तायडे(18) आणि रुतिका कदम यांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले असून जखमींना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी चालकाला बदलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.